1. {दुष्टाईकडे देव दुर्लक्ष करतो ही ईयोबाची तक्रार} PS “त्या सर्वशक्तिमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही?
त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही? |
4. ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात.
सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते. |
5. गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात.
त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते. |
9. दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात.
ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात. |
10. ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात,
ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात. |
11. ते आवाराच्या आत तेल काढतात,
ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात. |
12. शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते,
घायाळाचा आत्मा आरोळी मारतो, परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही. |
13. काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात.
देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही. |
15. ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो.
तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो. |
16. रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात.
पण दिवसा ते स्वत:ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात. |
17. त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते.
त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते. |
18. पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात,
त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो, त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत. |
19. हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते.
त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते. |
20. ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल,
त्याची आठवण राहणार नाही, त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल. |
21. दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत,
ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत. |
24. ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात.
खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात. आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात. |
25. या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो, मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल?
माझे बोलने निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?” PE |