6. जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल,
पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो. |
7. जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते;
आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो. |
10. जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते;
जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो. |
11. जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते;
दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते. |
13. जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो,
परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो. |
15. जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल,
परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो. |
18. दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो,
परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते. |
19. जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल,
पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो. |
20. जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे,
पण ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत त्यांच्याविषयी त्यास आनंद वाटतो. |
21. दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा,
परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल. |
26. जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात,
पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल. |
27. जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो,
पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल. |
29. जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल,
आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल. |